Thursday 19 July 2012

मिडास राजा

www.daptaryswiwah.com परवा ऑफिसमध्ये सुनिताचा फोन  आला मला madam शी बोलायचे आहे.  मला ट्रान्स्फर केल्यावर तिने बोलायला सुरवात केली.madam २००८ मध्ये तुमच्याकडे माझ registration केल होत त्यावेळेस मी २९ वर्षाची होते व त्यावेळेस तुम्ही मला योग्य वयात लग्नाचे फायदे खूप कळकळीने समजावूनसांगत होतात परंतु मी त्यावेळेस  माझ्या carrier मध्ये खूप जोरात होते व सतत नवनवी प्रमोशन्स घेत होते व त्यामुळे मला अजिबात लग्नाचा विचार करावा वाटत नव्हता.  तुमच्यासारखेच  आई वडील मला वेळोवेळी सांगत होते व ह्या विषयावर घरात चर्चा सुरु झाली कि  आमच्यात  खूप भांडण व्हायचं व त्यानंतर महिनाभर आमच्यात घरात एकमेकाशी अबोला  असायचा , त्यावेळेसच माझ्या  काही मित्र मैत्रीणींच लग्न ठरत होते अथवा काहीची   नुकतीच ठरलेली  होती .  त्यामुळे शनिवार, रविवार आम्ही सगळे एकत्र येवून खूप मजा करायचो   exhibition ला जाणे सिनेमा,  हॉटेलला, पिकनिकला जाणे अशी आम्ही खूप धमाल करायचो . पाच दिवस मान मोडून काम करायचं व दोन  दिवस मित्रांबरोबर मस्त धमाल करायचं अस छान आयुष्य चाललं होते.  हातात काम होत, काहीतरी करण्याची जिद्द होती. हातात भरपूर पैसा होता व मजा करायला मित्र मैत्रिणी होते. ते दिवस खूप पटकन गेले.  हळूहळू सर्व मित्र मैत्रीणींचे लग्न झाले व त्यामुळे शनिवार, रविवार हे ते फक्त त्याच्या कुटुंबासाठी राखून ठेवायला लागले.  मी कोणालाही आता फोन केला कि पिकनिकला जाऊया सिनेमा, नाटक, exhibition ला जाऊया पण प्रत्येकाचेच काहीतरी कारणाने नाही होत अथवा कुटुंबाबरोबर आधीच त्याचं ते बघून झालेले असत.  आता मला खूप एकट एकट वाटत.  आई बाबांनी तर ह्या विषयावर माझ्याशी बोलणच सोडलं आहे.  माझी चूक मला खूप उशिरा लक्ष्यात आली.आता मला promotion मिळाल तरी वाटत कि हे सर्व कशासाठी व मला आता खरच एका जीवनसाथीची गरज आहे. आधी मी तुमच्याकडील अनेक चांगली स्थळे छोट्या छोट्या कारणांनी नाकारली.  आता मला ह्याचा खूप पश्चाताप होतो आहे.  आता काही चांगली स्थळे असतील तर प्लीज  मला सांगा,  मी त्यावेळेस फक्त बघते म्हणाले व फोन ठेवला.
तिच्याशी बोलून झाल्यावर मला आठवली ती लहानपणी वाचलेली मिडास राजाची गोष्ट त्यात त्या राजाला सोन्याचा खूप हव्यास असतो व तो देवाला वर मागतो मी ज्याला हात लावेल ते सोन्याचा होऊ दे देव तथास्तु म्हणतो.  राजा आपला राजवाडा त्यातील सर्व वस्तूला सोन्याच करत सुटतो आणि खूप आनंदाने ह्या सगळ्याकडे बघत बसतो.  जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा तो पहिला घासला हात लावतो तर तो सोन्याचा होतो आता सोन कस खाणार ? त्याचवेळेस त्याची लाडकी राजकन्या राजाजवळ येते व राजा तिला हात लावतो तर ती पण सोन्याची होते. त्यावेळेस त्याला सोन्याची खरी किंमत काय आहे ते कळते.  व आपल्या हव्यासाचा दुष्परिणाम लक्ष्यात येतो.  त्यावेळेस मला वाटलं होत एवढा मोढा राजा अस कसा वर मागतो.  परंतु आज आपण सगळे मिडास राजाच झालो आहोत. अजून हव अजून हव मोठ्ठ घर हव, दर महिन्याला बाजारत येणारे नव नवीन मोबाईल, कार्स हव्या सर्व brands च्या वस्तू हव्या . पण ह्यात किती म्हणजे बास हेच आपल्याला कळत नाही. सतत काहीतरी मिळवण्यासाठी आपण उर फुटेपर्यंत धावत आहोत. आयुष्यात ध्येय नक्की असावे ते मिळवण्यासाठी जिद्दीने मेहनत पण करावी परंतु हे करत असताना आपला मिडास राजा तर होत नाहीना हे हि बघावे अथवा सुनिता व मिडास राजा सारखी नंतर पस्तावण्याची वेळ आपल्यावर यायला नको. मिडास राजाला देवाने वर दिला होता व नंतर देवानेच त्याला उपशाप दिला होता. परंतु आपण हा वर देवाकडून न घेता स्वतःच घेतला आहे त्यामुळे वेळीच जाग येण्याचा उपशाप हा आपला आपल्यालाच मिळवावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment